( 13 Mar, 2015) महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान Published By : upscgk.com * महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर. * महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. * महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर. * महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५. * महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे. * महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे. * महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे. * महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात. * विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे. * महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते. * महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे. * महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे. * महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात. * महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे * महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. * महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. * महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा. * महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा. * महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर. * भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे. * भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते. * महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे. * महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर. * भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे. * महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो. * पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात. * गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. * प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. * गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत. * जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. * औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. * पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. * महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात. * कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात. * कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात. * विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात. * विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो. * महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे. * विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे. * संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे. * संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे. * राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे. * संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे. * ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे. * यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. * महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. * महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक. * पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे. * कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे. * आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला. * मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात. * यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात. * महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे. * नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे. * महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे. * शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे. * महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो. * शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे. * ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली. * तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे. * भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे. * महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे. * रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात. * स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक. * कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे. * राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. * बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे. * महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात. * महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे. * वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे. * नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. * सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. * महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात. * कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले. * कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे. * भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे. * सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला. * डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे. * फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे. * महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली. * माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे. * थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो. * रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. * भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९) * महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये ८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये १ लाख ३४ हजार ४९३ कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये १ लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या आसपास कर्ज होते.